नदीकाठी भटकणारी माणसं
नदीकाठी भटकणारी माणसं
नेहमी एका हलत्या घरातून
मावळतीचं आकाश पाहतात
निळाईवर उगवलेला शोधून ठेवतात
खुणेचा तारा एकुलता
आणि जातील तिथे
अंगणात निनावी दाणापाणी ठेवता
नदीकाठी भटकणार्य़ा माणसांना
नेहमी उपलब्ध नसतात
पैलतीरावर नेणारे पूल
ते डोळ्यातल्या डोळ्यात
सुकवू पाहतात ऐलतीराची कासावीस
नदीकाठी भटकलेल्या माणसांना
अस्थी निर्माल्य आणि पानदिव्यांचे
हेलकावे आठवतात
मृत्य़ू श्रद्धा आणि फ़डफ़डत्या जीवनयात्रेचं
प्रतीक म्हणून
नदी सुकून जाते
तेव्हा माणसं तडफ़डून
आपल्या रक्तवाहिन्या चाचपतात
वाळू उकरतात
आणि झोपेत आई आई म्हणून ओरडतात
नदीकाठी भटकणारी माणसं
रस्ता भरकटतात भाकरीसाठी कधीतरी
त्यांना माहीत नसतात भयभीत सशांसारखेच
रस्ते ओलांडण्याचे नियम
ते उड्डाणपुलाखाली वाकून वाकून पाहतात
नदीशी आपल्याच भावंडांनी
केलेल्या विश्वासघाताचं काळंकभिन्न पाणी
घास तर अडतोच घशात अशावेळी
लेकीच्या संसाराचं वाटोळं झालेलं पाहून
परत फ़िरणार्या बापासारखे
जंगलाच्या दिशेनं चालू लागतात
नदीकाठी भटकणारी उदास माणसं
श्रीधर नांदेडकर
नदीकाठी भटकणारी माणसं
नेहमी एका हलत्या घरातून
मावळतीचं आकाश पाहतात
निळाईवर उगवलेला शोधून ठेवतात
खुणेचा तारा एकुलता
आणि जातील तिथे
अंगणात निनावी दाणापाणी ठेवता
नदीकाठी भटकणार्य़ा माणसांना
नेहमी उपलब्ध नसतात
पैलतीरावर नेणारे पूल
ते डोळ्यातल्या डोळ्यात
सुकवू पाहतात ऐलतीराची कासावीस
नदीकाठी भटकलेल्या माणसांना
अस्थी निर्माल्य आणि पानदिव्यांचे
हेलकावे आठवतात
मृत्य़ू श्रद्धा आणि फ़डफ़डत्या जीवनयात्रेचं
प्रतीक म्हणून
नदी सुकून जाते
तेव्हा माणसं तडफ़डून
आपल्या रक्तवाहिन्या चाचपतात
वाळू उकरतात
आणि झोपेत आई आई म्हणून ओरडतात
नदीकाठी भटकणारी माणसं
रस्ता भरकटतात भाकरीसाठी कधीतरी
त्यांना माहीत नसतात भयभीत सशांसारखेच
रस्ते ओलांडण्याचे नियम
ते उड्डाणपुलाखाली वाकून वाकून पाहतात
नदीशी आपल्याच भावंडांनी
केलेल्या विश्वासघाताचं काळंकभिन्न पाणी
घास तर अडतोच घशात अशावेळी
लेकीच्या संसाराचं वाटोळं झालेलं पाहून
परत फ़िरणार्या बापासारखे
जंगलाच्या दिशेनं चालू लागतात
नदीकाठी भटकणारी उदास माणसं
श्रीधर नांदेडकर
प्रिय श्रीधर, मी तुझ्या कविता आवर्जून वाचतो. त्या प्रस्थापित चालीच्या नाहीयत. म्हणून आवडतात. वरील कविता उत्तम आहे. फक्त शेवटची दोन कडवी नसतील तर अधिक उत्तम आहे."आणि झोपेत आई आई म्हणून ओरडतात" इथे संपावी कविता. क्षमस्व.
ReplyDeleteरवी लाखे
छान कविता आहे एकदम....ज्यांनी काह्रोखा नदी अनुभवलीय अश्याना खरोखर तिच्या विषयीची ही आंतरिक लय भावून जाते मनोमन........................
ReplyDeleteनांदेडकर सरांच्या कविता प्रतिमांच्या नव्या प्रदेशात माणुसकी,नैतिकता,मूल्य यांचा अनुभव देतात ,
ReplyDeleteत्यांची कविता संपत नाही .मनात अर्थांचे अनेक वलये निर्माण करते ..मराठी भाषेला हृदयापर्यंत पहोचविते.